Friday, June 22, 2012

श्रद्धांजली : प्रसिद्ध लेखक भा.द.खेर यांना श्रद्धांजली

भा. द. खेर हे नाव वाचकांना अत्यंत चतुरस्त्र लेखन करणारे म्हणून परिचित आहे. मित्रांनो भा. द. खेर आज आपल्यांत नाहीत. गेल्या चार वर्षापासून ते अंथरूणाला खिळून होते. प्रकृती अस्वास्थ आणि वयोमानामुळे त्यांना द्रवरुप आहार दिला जात होता. अखेर गुरूवारी सकाळी दहा वाजता राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे.



भा. द. खेर यांची पुढील प्रमुख पुस्तके प्रसिद्ध आहेत

१. चाणक्य
२. हिरोशिमा
३. प्रबुद्ध (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर)
४. हसरे दु:ख (चार्ली चॅप्लीनचा डोळ्यांत पाणी आणणारा जीवनपट)
५. क्रांतीफुले
६. यज्ञ
७. 'दि प्रिन्सेस' या कर्नल मनोहर माळगावकर यांच्या जगप्रसिद्ध कादंबरीचा मराठी अनुवाद

व इत्यादी अनेक ....

भा. द. खेर या थोर लेखकाला ही भावपूर्ण व विनम्र श्रद्धांजली

माहिती सौजन्य : ईसकाळ.कॉम

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मेहता पब्लिशिंग हाऊस च्या संकेतस्थळावर भा. द. खेर यांचा जीवनपटच दिलेला आहे. तोच खाली देतो आहे

माहितीचा थेट दुवा : http://www.mehtapublishinghouse.com/AuthorDetails.aspx?AuthorCode=115

जन्म : 12 जून 1917

ठिकाण : कर्जत जि. अहमदनगर

शिक्षण : बी. ए. नंतर दोन वर्षे एल.एल.बी. चा अभ्यास

व्यवसाय : सुप्रसिद्ध कादंबरीकार, लेखक आणि पत्रकार लेखन आणि पत्रकारिता यातील कामगिरी

पत्रकारिता : दै. केसरी चे वीस वर्ष सहसंपादक, सह्याद्रीचे दहा वर्षे संपादक, समग्र टिळक 7000 पृष्ठे - संपादक, सावरकर साहित्य नवनीत चे एक संपादक या शिवाय जवळपास आठशेच्यावर पृष्ठांचे स्फुट लेखन.

लेखन : पहिले पुस्तक `नादलही' कथासंग्रह प्रकाशित - 3 सप्टेंबर 1939 आजवर जवळपास 100 लहान-मोठी पुस्तके प्रकाशित. `चरित्रात्मक कादंबरी' हा वाङमयप्रकार मराठीत प्रथम आणण्याचा मान. त्यापौकी सावरकरांच्या जीवनावरील `यज्ञ', लालबहाद्दूर शास्त्रींच्या जीवनावरील `अमृतपत्र', नेहरु कुटुंबावरील `आनंद भवन', डॉ. आंबेडकरांच्या जीवनावरील `प्रबुद्ध', चार्ली चॅप्लिनच्या जीवनावरील `हसरे दु:ख', चाफेकर बंधूंच्या जीवनावरील `क्रांतिफुले', `चाणक्य', महाभारतावरील `कल्पवृक्ष', झाशीच्या राणीच्या जीवनावरील `समर सौदामिनी', श्रीकृष्णावरील `सारथी सवा|चा', श्रीरामावरील `सेतूबंधन', स्वा. सावरकरांच्या तत्वज्ञानावरील `पूर्णाहूती', नेपोलियनच्या जीवनावरील `दिग्विजय' या कादंबर्या विशेष गाजल्या. तसेच जपानमधील अणुसंहारावरील `हिरोशिमा' ही कादंबरी गाजली. त्याचबरोबर आत्मचरित्रात्मक आठवणींची `स्मृतीयात्रा', `सूर भरला अंतरी', स्मृतीगंगा' ही पुस्तकेही गाजली. याशिवाय `दि प्रिन्सेस', `वादळ वारा', `आधांतरी' ही भाषांतरीत पुस्तकेही लोकप्रिय ठरली. पन्नास वर्षे अव्याहत लेखन. आत्तापय|त 25000 पृष्ठांच्यावर छापील पाने प्रकाशित. चरित्रात्मक कादंबरी हा प्रकार रूढ केला. तो प्रकार विशेष आवडतो.

पुरस्कार : `आनंदभवन' कादंबरीला 1974 चे सोविएत लॅण्ड नेहरूअॅवॉर्ड `हिरोशिमा'ला 1984 चे सोविएत लॅण्ड नेहरूअॅवॉर्ड `हिरोशिमा'ला 1984 चा महाराष्ट्र राज्य पुरस्कार `हसरे दु:ख'ला 1993 चा साहित्यसम्राट न. चिं. केळकर पुरस्कार

इतर मानसन्मान आणि जाहीर सत्कार : 1) स्वा. सावरकरांचे `1857 चे स्वातंत्र्यसमर' या जगद्विख्यात ग्रंथाची सहावी आवृत्ती प्रकाशित करण्याचा मान. 2) 14 जानेवारी 1947 रोजी स्वा. सावरकरांच्या `1857 चे स्वातंत्र्यसमर' या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात टिळक स्मारक मंदिरात डॉ. ना.भा. खरे यांच्या हस्ते सत्कार 3) 10 मे 1952 रोजी `अभिनव भारता'च्या सांगता समारंभाच्या वेळी क्रांतिकारक वाङ्मय लिहिल्याबद्दल स्वा. सावरकरांच्या हस्ते सत्कार. 4) 1976 मध्ये सात खंडातील सात हजार पृष्ठांचे समग्र टिळक वाङ्मयाचे संपादन केल्याबद्दल दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्याहस्ते टिळक स्मारक मंदिरामध्ये सत्कार. 5) 14 जानेवारी 1981 रोजी `केसरी' या दीड हजार पृष्ठांच्या ग्रंथाचे संपादन केल्याबद्दल दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या हस्ते टिळक स्मारक विद्यापिठात दुसर्यांदा सत्कार. 6) 1967 मध्ये `दि प्रिन्सेस' या कर्नल मनोहर माळगावकर यांच्या जगप्रसिद्ध कादंबरीच्या भाषांतराच्या प्रकाशन समारंभात स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिरात सत्कार. 7) 6 आॅगस्ट 1984 रोजी `हिरोशिमा' या कादंबरीच्या प्रकाशन समारंभाच्यावेळी टिळक स्मारक मंदिरात स्व.यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते सत्कार. 1993 मध्ये आद्य श्री शंकराचार्य पीठातर्फे प्रमुख साहित्यिक या नात्याने पुण्याच्या श्री. शंकराचार्य मंदिरात सत्कार आणि मानचिन्ह. 9) 1994 मध्ये `क्रांतिफुले' या क्रांतिवीर चाफेकर बंधूंवरील कादंबरीच्या प्रकाशन समारंभाच्या वेळी माननीय श्री. अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते सत्कार. 10) 1991 मध्ये अमृतमहोत्सवानिमित्त `रामायण' कर्ते श्री. रामानंद सागर यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिरात जाहीर सत्कार. 11) 1995 मध्ये मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शंभरावे पुस्तक `पुर्णाहुती' प्रकाशित.

लेखनानिमित्त परदेशप्रवास 1) भारत सरकारतर्फे 1969 मध्ये `अमृतपुत्र' ही शास्त्रीजींच्या जीवनावर कादंबरी लिहिण्यासाठी स्टेट गेस्ट म्हणून रशिया दौरा. 2) जर्मन सरकारच्या निमंत्रणावरुन सुभाषबाबूंच्या जीवनावर कादंबरी लिहिण्यासाठी पूर्व आणि पश्चिम जर्मनीचा प्रवास. 3) चर्चिल, चार्ली चॅप्लिन, सावरकर यांची माहिती घेण्यासाठी 1969 मध्ये लंडनभेट. 4) स्टेट गेस्ट म्हणून 1976 मध्ये जपान सरकारच्या निमंत्रणावरुन हिरोशिमावर लिहिण्यासाठी जपान दौरा.

परदेशी प्रसारमाध्यमावरुन भाषण-मुलाखत 1) मॉस्को रेडिओ वरुन भाषण 2) एन.एच.के. जपानवरुन मुलाखत प्रसारित 3) हिरोशिमावर लिहिण्यासाठी भारतीय लेखकाचे जपानमध्ये आगमन, अशा आशयाची बातमी फोटोसह जपानी वृत्तपत्रांतून प्रकाशित.

भा. द. खेर या थोर लेखकाला ही भावपूर्ण व विनम्र श्रद्धांजली

No comments:

Post a Comment